आयुष्यात कधी डायरी लिहीली नाही...
१० वी बोर्डाच्या परिक्षेतला पेपर लिहिल्यानंतर, मराठी लिखाणाशी असलेला ( सक्तीचा ) संबंध संपला...
लिहायचे कशासाठी ? . . . तर मार्क मिळवण्यासाठी ...
१५ निबंधाचे आणि १० पत्रलेखनाचे अशी शाळेने मनापासुन समजुत करुन दिलेली...
त्यातुनही जर मनातले काही लिहावे, तर मास्तर लाल शाईने वही सजवायचा...
शाळेने शिकवला एकच धडा . . . ' गाईड घोका आणि पेपरावर ओका '